१.
घेऊन जरी निजतो , खोट्यांस उश्याला मी
केले न कधी लज्जित , कुठल्याच ख-याला मी
घेऊन जरी निजतो , खोट्यांस उश्याला मी
केले न कधी लज्जित , कुठल्याच ख-याला मी
" व्याकूळ तहानेने , माझे अवघे पाणी "
ही हाक समुद्राची , सांगीन झ-याला मी
ही हाक समुद्राची , सांगीन झ-याला मी
हातात अगर माझ्या , नाहीच जगवणे तर
हे झाड विनाकारण , लावूच कश्याला मी
हे झाड विनाकारण , लावूच कश्याला मी
वैकुंठ सदेह कुणी , जाईल कसे , बाबा
भुलथाप असे रे,ही , सांगीन तुक्याला मी
हातून गुन्हा घडला , चिंता न परंतू मज
निवडून सखे येता , पचवीन गुन्ह्याला मी
मागेच थकून तिथे , राहून पिलू गेले
घेऊन जरा ये तू , अडवीन थव्याला मी
" मज याद तुम्ही येता ", तेथून बुढी सांगे
देऊच निरोप कसा , चिंतीत बुढ्याला मी
तू वाट जगाला पण , दे तेल मला माझे
वांग्यास नको तर ते , देईन वड्याला मी
तू आज उपाशी तर , मदतीस विचार जरा
मिळणार तुला उत्तर , " येईन ऊद्याला मी "
" येशील पुन्हा जेंव्हा , घेऊन चहा जाशिल "
ऐकून सखे आलो , हे काल पुण्याला मी
नादास अम्हा लावुन , हसतोय कसा मेला
शाब्दांत गवसला तर , बदडीन 'झुक्या'ला मी
२.
गावा-गावांतुन इथल्या , जाऊन घरोघर आधी
ये आज करुया आपण , समतेचा जागर आधी
आहेस कवी तू मोठा , मजलाही माहित आहे
पण कविता-बिविता नंतर,तू दे मज भाकर आधी
चरकातच ऊस अजूनी , पण ज्याला त्याला वाटे
आली तर यावी त्याच्या , वाट्याला साखर आधी
झालेच युदध जर तिसरे , ते होइल पाण्यासाठी
धरती , आकाश असू दे , ये वाटू सागर आधी
हे शेतक-या आपणही , पेरूच आपुली शेती
पण येऊ दे आकाशी , गर्भार पयोधर आधी
(पयोधर = ढग)
जो येतो तुज हाकलतो , दावणीस बांधुन घेतो
घे शिकून भोळ्या सांबा , डोक्याचा वापर आधी
मातीत राबुनी झाले , आयुष्य तुझेही माती
तू काढ तुझ्या डोक्यातुन , बापाचे वावर आधी
विश्वास मलाही आहे , आम्हास मिळेलच पाणी
पण राहू दे तर यारा , दगडास गरोदर आधी
ह्या छळती मजला सा-या , मी कुणा-कुणाचे ऐकू
प्रत्येक गझल मज म्हणते , तू व्यक्त मला कर आधी
३.
ती न याला हवी , ती न त्याला हवी
दुर्बलाची अहिंसा कुणाला हवी
फक्त उध्वस्ततेची मुकी सम्मती
आज चेकाळल्या वादळाला हवी
धर्म हा कोणता , माणसे मारुनी
इश्वराची कृपा , माणसाला हवी
शेत रक्षावया , जी असे राखुनी
ती सुरक्षा अता, कुंपणाला हवी
ती सुरक्षा अता, कुंपणाला हवी
जर जगाच्या भल्यास्तव तुझे राबणे
तर तुझी काळजी , या जगाला हवी
तर तुझी काळजी , या जगाला हवी
देशभक्तीस माझ्या,मला सांग तू
भेकडांची प्रशस्ती कशाला हवी
भेकडांची प्रशस्ती कशाला हवी
माणसा सारखा , वागतो आज हा
लाज थोडी तरी , पावसाला हवी
लाज थोडी तरी , पावसाला हवी
जे खरे तेवढे , स्पष्ट बोलायची
एवढीशी मुभा , आरशाला हवी
एवढीशी मुभा , आरशाला हवी
ना कुण्या एकट्याचेच आकाश हे
शाश्वती ही चिमण-पाखराला हवी
शाश्वती ही चिमण-पाखराला हवी
नापिकीचा नशीबी जुना खेळ हा
अन् नवी खेळणी, लेकराला हवी
अन् नवी खेळणी, लेकराला हवी
मी रडायास तय्यार आहेच पण
सांत्वनाची हमी काळजाला हवी
सांत्वनाची हमी काळजाला हवी
४.
आकाशवेणा वादळी , जेंव्हा कधी ते सोसती
माझे सराइत शब्दही , कित्येकदा घायाळती
आकाशवेणा वादळी , जेंव्हा कधी ते सोसती
माझे सराइत शब्दही , कित्येकदा घायाळती
जिंकूनिया समरांगणी , येतात जेंव्हा वेदना
मज प्रश्न पडतो कैकदा , कैसी करावी आरती
मज प्रश्न पडतो कैकदा , कैसी करावी आरती
मम अस्मितेचे शेवटी ,नव सरण जेंव्हा पेटले
तेंव्हा चितेवर आतली , संवेदना गेली सती
तेंव्हा चितेवर आतली , संवेदना गेली सती
आले जरा भेटावया , मज दुःख जेंव्हा,नेमके
गेले कुठे सारेच ते , माझ्या सुखाचे सोबती
गेले कुठे सारेच ते , माझ्या सुखाचे सोबती
मी नेहमी ज्यांच्यापुनी , राखून अंतर राहिलो
आली कशी ती ना कळे,नकली पिलावळ भोवती
आली कशी ती ना कळे,नकली पिलावळ भोवती
ज्यांच्या पिढ्या अजुनी इथे,मातीत आहे झोपल्या
त्यांना " न तुमचा देश हा " , हे सांगणे झाले अती
त्यांना " न तुमचा देश हा " , हे सांगणे झाले अती
मग रात्रभर ज्यांच्यासवे , खेळून थकतो चंद्रमा
किरणे रवीची पांघरुन , त्या तारकाही झोपती
किरणे रवीची पांघरुन , त्या तारकाही झोपती
आश्वासने सुख-शांतिची , देऊन दे दुःखेच जो
मजला कळे ना त्याच का , देवास ते आराधती
मजला कळे ना त्याच का , देवास ते आराधती
चौकात जेंव्हापासुनी , यांचा दरोगा ठाकला
तेंव्हापुनी ही वाहने , फुटपाथवरही धावती
तेंव्हापुनी ही वाहने , फुटपाथवरही धावती
जर सांगता तुम्ही अता , आम्ही न त्या पंथातले
तुमचे सकल चेलेच मग , दिंडीत का त्या नाचती
तुमचे सकल चेलेच मग , दिंडीत का त्या नाचती
मृत्यू-सखा वेशीवरी , आलाच असला पाहिजे
तेंव्हाच माझी सोवळी , दुःखे मला शृंगारती
तेंव्हाच माझी सोवळी , दुःखे मला शृंगारती
५.
घननीळ तुझ्या मेघातुन , धारा बरसाव्या सखये
अन् सूर्याच्या पारंब्या,जमिनीत रुजाव्या सखये
घननीळ तुझ्या मेघातुन , धारा बरसाव्या सखये
अन् सूर्याच्या पारंब्या,जमिनीत रुजाव्या सखये
ज्या रुसून गेल्या होत्या , वाळूच्या व्यवहाराने
परतून किनार-यावरती,त्या लाटा याव्या सखये
परतून किनार-यावरती,त्या लाटा याव्या सखये
श्वासांच्या संध्याकाळी , लालसा अजुनी आहे
गात्रांतिल मुग्ध उषेच्या,मी कविता गाव्या सखये
गात्रांतिल मुग्ध उषेच्या,मी कविता गाव्या सखये
बाजार नेत्र-चोरांचा , गल्लीत येथल्या भरतो
पापण्या जपूनच तू ही , येथे उघडाव्या सखये
पापण्या जपूनच तू ही , येथे उघडाव्या सखये
बोटावर चेटकिणीच्या , ही दुनिया वसली आहे
देऊच नको भलत्याला, हृदयाच्या चाव्या सखये
देऊच नको भलत्याला, हृदयाच्या चाव्या सखये
वृक्षाला माझ्या अवघ्या, हळुवार लपेटून घ्याया
तू नसांनसांतुन तुझिया , वेली उगवाव्या सखये
तू नसांनसांतुन तुझिया , वेली उगवाव्या सखये
ही किमया सौंदर्याची , वा दृष्टी चळली माझी
का ढगाआडल्या मजला,चांदण्या दिसाव्या सखये
का ढगाआडल्या मजला,चांदण्या दिसाव्या सखये
घर-दार प्रकाशित करुनी , तू रात्र पराजित केली
पण झगमगत्या ह्या पणत्या,वेळीच विझाव्या सखये
पण झगमगत्या ह्या पणत्या,वेळीच विझाव्या सखये
तू एकच केवळ माझ्या , प्राणात घनीभुत व्हावी
मग माझ्या इच्छा सा-या, वा-यात विराव्या सखये
मग माझ्या इच्छा सा-या, वा-यात विराव्या सखये
No comments:
Post a Comment